मुंबई: मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल हे लागून गेले आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीत, या मुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, हे निश्चित केले पाहिजे, अशा शब्दात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरले, त्यावर अध्यक्षांनी या संदर्भात उचित जबाबदारी निश्चित करण्याचे सरकारला निर्देशित केले.
थोरात म्हणाले, अहवालावर चर्चा करता येत नाही हे मला माहीत आहे, परंतु आपण २०१३ नंतरचे अहवाल एकत्रित देत आहात, मुंबई विद्यापीठाचे विविध निकाल कधीच वेळेवर लागत नाही, त्यातून विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, विद्यार्थी आंदोलन करतो, हे राज्याला शोभणारे नाही.
बीपीएड कोर्स पूर्ण झाला, परीक्षा झाल्या, निकाल लागले पण अजून डिग्री सर्टिफिकेट देण्यात आलेले नाही. मार्कशीट देखील देण्यात आलेली नाही त्यामुळे टेम्पररी डिग्री सर्टिफिकेट जे मार्कशीट सोबत मिळते तेही देण्यात आलेले नाही. परिणाम असा होतो की, विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण करून देखील त्यांना नोकरीसाठी अर्ज करणे किंवा पुढील शिक्षणाकरिता जाणे शक्य होत नाहीये.
मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण…
वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…
शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18…
शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…