पुणे (प्रतिनिधी): ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) सिनेटसाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि कुलगुरू यांच्या तर्फे नामांकन करण्यात आले आहे. डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच म्हणावी लागेल.
डॉ.पराग संचेती यांनी 1 जानेवारी 1993 रोजी एस आय ओ आर पीजी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. 2014 मध्ये संचेती हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स आणि रिहॅबिलिटेशन विभागात अधिष्ठाता आणि प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून डॉ.संचेती यांनी आपले प्रभावी कतृत्व सिद्ध केले आहे.त्यांची दूरदृष्टी आणि समर्पण यामुळे हॉस्पिटलचा विस्तार आणि यश सातत्याने वाढत आहे.
विशेष म्हणजे डॉ.संचेती हे सध्या एशिया पॅसिफिक नी सोसायटीचे महासचिव, इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचे उपाध्यक्ष आणि इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जरीचे संस्थापक सदस्य अशी प्रतिष्ठेची पदे भूषवित आहेत. अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिनच्या बोर्ड सदस्यत्वाच्या माध्यमातून ते या क्षेत्रात जागतिक पातळीवर योगदान देत आहेत.
तसेच प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये डॉ.संचेती यांचे 50 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या अभ्यासपूर्ण कामांचा वैद्यकीय पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला समावेश हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. ’क्लिनिकल रिसर्च मेड इझी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन याप्रती असलेली त्यांची वचनबध्दता दर्शविते. यापूर्वी डॉ.संचेती यांना राष्ट्र सेवा पुरस्कार, मिटकॉन अॅचिव्हर्स अवॉर्ड, अशा नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…