मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान टिळक नगर येथील युगप्रवर्तक बुद्ध विहाराच्या प्रांगणात नुकतेच संपन्न झाले. यावेळी लेखक, कवी अनंत धनसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
धर्म,जात आणि राष्ट्र प्रेमाच्या खोट्या संकल्पनांच्या आधारे समाजात दुही माजवली जात आहे. आपले राष्ट्र भौगोलिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या टिकविण्याची फार मोठी जबाबदारी भारतीय समाजावर आली आहे, असे प्रतिपादन यावेळी अनंत धनसरे यांनी केले. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हाच संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार महिलांना मिळाला आहे. तेव्हा रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत लोकशाहीचे रक्षण आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.
यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम केदारे, सरचिटणीस प्रकाश वाघमारे, खजिनदार रामचंद्र हिरे आदी पदाधिकाऱ्यांसह जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. समितीचे कार्यकारी सदस्य दिलीप केदारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…