संभाजीनगर: महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेमधील एक अत्यंत विश्वसनीय आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील. परंतु त्यांच्याच चेहऱ्याचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या सहाय्याने गैरवापर करूनछत्रपती संभाजीनगर येथील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांनी गंडवण्यात आलं, ही घटना धक्कादायक आहे.
घटना कशी घडली
छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध अधिकाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉल केला.
फोनवरील व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी सांगत असं सांगितलं की, तुमच्या खात्यातून 20 लाख रुपये दहशतवाद्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. या कारणावरून “डिजिटल अरेस्ट” होऊ शकतो, अशा धमक्या देत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
AI वापरून बनावट चेहरा
गुन्हेगारांनी AI चा वापर करून एक असा व्हिडीओ तयार केला ज्यात विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरला गेला होता. त्याच्यासारखं बोलणं, चेहऱ्याची हालचाल, आणि वर्तन हुबेहुब होतं, त्यामुळे दाम्पत्याला खोटं वाटलंच नाही. यामुळे २ ते ७ जुलै दरम्यान रोज फोन करून दबाव टाकण्यात आला आणि टप्प्याटप्प्याने वृद्ध दाम्पत्याकडून तब्बल ₹78.60 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणात आता सायबर गुन्हेगारांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
लक्षात ठेवा
“डिजिटल अरेस्ट” असं काहीही कायद्यात अस्तित्वात नाही. हा एक सायबर गुन्हेगारांचा बनाव आहे, जो लोकांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी वापरला जातो.
सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी…
1930 वर कॉल करा; सायबर फसवणुकीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन https://cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. घरातील ज्येष्ठ नागरिकांना या प्रकारांची माहिती द्या
नागरिकांसाठी महत्वाचा संदेश
कोणताही अधिकारी किंवा पोलीस व्हिडीओ कॉलवरून तुमच्याकडून पैसे मागत नाही.
कुठलीही शंका आली तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा.
“AI चेहऱ्यांद्वारे फसवणूक” ही नवी पद्धत आहे. त्यामुळे अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.
व्हिडीओ कॉलवर ओळखीचा चेहरा दिसला म्हणून विश्वास ठेऊ नका.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…