महाराष्ट्र

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला.

सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ग्रामविकास विभाग वगळता इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामविकास विभागप्रमुखाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवाल खंड दोनमधील वेतन श्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत शासन वित्त विभागाच्या वेतन त्रुटीबाबत सूचना निर्गमित झालेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संवर्ग वगळता सर्वच कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे. या विरोधात आता जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सर्व संघटना आक्रमक पवित्रा घेऊन कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यावेळी अध्यक्ष लिपिक संघटना वंदना बांदल, उपाध्यक्ष आबासाहेब सरोदे, गुलाबराव खरबस, दिलीप धोत्रे, मच्छिद्र सारूक, भुजंगराव कर्पे, बिऱ्हाडे, सविता सालके, विनिता माने, योगिता गाडेबैल, विलास कोकाटे, आदी कर्मचारी ऊपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

10 मिनिटे ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

12 मिनिटे ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

17 मिनिटे ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

30 मिनिटे ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

33 मिनिटे ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

2 तास ago