महाराष्ट्र

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) फेब्रुवारी २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर उमेदवारांचे नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे (दि. २५) जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात धरणे आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा (निकाल) मुलाखत २०२१ व महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२२ ला स्थगिती ला स्थगिती मिळावी. मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करुन कृषी अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी. राज्यासाठी स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे आदी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वरील मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन न्याय द्यावा, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

2 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

2 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

5 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

8 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

8 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

8 तास ago