महाराष्ट्र

युवक काँग्रेसचे संघटन महाराष्ट्रभर उभे करा; हर्षवर्धन सपकाळ

ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्ताधारी वाद निर्माण करत आहेत

मुंबई: काँग्रेस पक्षातून काही लोक गेले पण ही सुद्धा नवीन नेतृत्वाला संधीच आहे. विधानसभेच्या २८८ जागां आहेत आण यावेळी काँग्रेसचे १६ आमदार निवडून आलेले आहेत. आता २७२ जागांवर नेतृत्व करण्याची संधी युवक काँग्रेसला आहे. लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करा. काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे तो विचार कानाकोपऱ्यात पोहचवत समाजाला अभिप्रेत असणारे संघटन उभे करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष शरद आहेर, रामचंद्र आबा दळवी, आमदार हेमंत ओगले, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष मंजुनाथ गौडा शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, ब्रिज भूषण दत्त, शाह आलम, प्रा. बालाजी गाडे, विश्वजित हाप्पे आनंद सिंग, करिना झेवियर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतही नवीन व तरुण चेहऱ्यांना जास्त संधी देण्यात आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होत आहेत. कोणाला संधी मिळते मिळते नाही याची वाट न पाहता पक्षाचे काम करा. संघटनेत झोकून देऊन काम केले लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष केला की संधी नक्की मिळते. विचार व कामाची कटिबद्धता कायम ठेवा. युवक काँग्रेसमध्ये काम केलेल्या अनेकांना काँग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. संघटनेचे काम करा व भविष्यातील नेतृत्व तयार करा असे सपकाळ म्हणाले.

नवनियुक्त युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यावेळी म्हणाले की, हे पद भूषवताना अनेक आव्हानं उभी आहेत पण राज्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फौज उभी करू. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे युवक काँग्रेस मदतीला धावून जाईल. युवकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली जातील. बुथ सक्षम करा मग दिल्ली दूर नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी युवक काँग्रेसने आजपासून कामाला लागावे, असे मोरे म्हणाले.

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांनी कुपरेज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

वराह जयंतीची मागणी तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा…

कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. कावड यात्रा ही भारताला किंवा महाराष्ट्राला काही नवीन नाही पण वराह जयंती साजरा करावी अशी मागणी जर सत्ताधारी पक्षातील लोक करत असतील तर ते संतापजनक व निषेधार्ह आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट असून तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा त्यांचा अजेंडा आहे असे सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, या सरकाला फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढेच माहित आहे, त्यामुळे काल मोनोरेलची जी घटना घडली तसे प्रकार घडत आहेत. मुंबईची अवस्था बकाल करून ठेवली आहे. मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयांच्या ठेवी होती त्या कुठे गेल्या, हा प्रश्न आहे. सरकारने यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

9 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

11 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

16 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

16 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

16 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

16 तास ago