महाराष्ट्र

भाजप–शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागांचा अंदाज;

दुःखाच्या वातावरणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा पाठिंबा

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर चा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार भाजप आणि शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या शोकाकुल वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा पाठिंबा मिळाल्याचं चित्र या एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.

२९ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा, रॅली न काढण्याचा निर्णय घेतला होता. केवळ पत्रकांद्वारे संपर्क साधत ही निवडणूक लढवण्यात आली.

दरम्यान, 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर जाहीर झालेल्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार,

भाजप – २६३ जागा

शिवसेना (शिंदे गट) – १५६ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ११७ जागा

असा अंदाज वर्तवण्यात आला असून, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीने महाविकास आघाडीवर सरशी मिळवल्याचं या एक्झिट पोलमधून दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत.

एक्झिट पोलनुसार,

काँग्रेस – ६१ जागा

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ४८ जागा

मनसे – ६ जागा

इतर पक्ष – ३७ जागा

या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार हे २९ जानेवारी रोजी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. मात्र विमानतळाजवळच झालेल्या अपघाताने राज्य हादरलं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही, मतदारांनी पक्षावर विश्वास दाखवल्याचं या एक्झिट पोलमधून अधोरेखित होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

11 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

11 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

14 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

14 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

15 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

15 तास ago