महाराष्ट्र

भाजप–शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागांचा अंदाज;

दुःखाच्या वातावरणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा पाठिंबा

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर चा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार भाजप आणि शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या शोकाकुल वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा पाठिंबा मिळाल्याचं चित्र या एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.

२९ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा, रॅली न काढण्याचा निर्णय घेतला होता. केवळ पत्रकांद्वारे संपर्क साधत ही निवडणूक लढवण्यात आली.

दरम्यान, 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर जाहीर झालेल्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार,

भाजप – २६३ जागा

शिवसेना (शिंदे गट) – १५६ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ११७ जागा

असा अंदाज वर्तवण्यात आला असून, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीने महाविकास आघाडीवर सरशी मिळवल्याचं या एक्झिट पोलमधून दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत.

एक्झिट पोलनुसार,

काँग्रेस – ६१ जागा

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ४८ जागा

मनसे – ६ जागा

इतर पक्ष – ३७ जागा

या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार हे २९ जानेवारी रोजी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. मात्र विमानतळाजवळच झालेल्या अपघाताने राज्य हादरलं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही, मतदारांनी पक्षावर विश्वास दाखवल्याचं या एक्झिट पोलमधून अधोरेखित होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

7 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

21 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

21 तास ago