महाराष्ट्र

गिरीष महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई: ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.

सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नसून देशाच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाली, तर या मोहिमेचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.

गिरीष महाजन यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समोर आली असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, असे सांगत त्यांनी महाजन यांच्या विधानाचा निषेध केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील त्या काळातील सुरक्षा मोहिमांशी संबंधित होते. मग त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.

महाजन यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची तुलना महंमद शाह अब्दालीशी करून भारतीय सैन्यदलाचाच अपमान केला असून खलिस्तानी दहशतवादी जर्नैलसिंग भिंद्रनवाले याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून केलेले वक्तव्य हे सरकारचे अधिकृत धोरण आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष महाजन यांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशासाठी बलिदान दिलेल्या नेतृत्वाचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल गिरीष महाजन यांनी देशाची आणि सैन्यदलाची माफी मागावी, तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

9 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

9 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

23 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago