महाराष्ट्र

विद्यार्थी हितासाठी बी.ई./बी.टेक व एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ११ जुलै २०२५ होती. आता मुदतवाढ देऊन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,,काही उमेदवार, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिक भेटीद्वारे, ई-मेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नोंदणीसाठी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या भवितव्यास प्राधान्य देऊन बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवार, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहनही मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

4 मिनिटे ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

8 मिनिटे ago

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे…

11 मिनिटे ago

MIFF 2026 मधील मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी…

18 मिनिटे ago

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी विकासाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणात मोठ्या…

21 मिनिटे ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

24 मिनिटे ago