महाराष्ट्र

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिरूर तालुक्याने एक गुणी कलावंत गमावला आहे.

हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक मान्यवर नाव म्हणून ओळखले जात होते. ‘हरि -नाथा ‘ या दोन भांवाच्या नावाने त्यांच्या ताफ्याची ख्याती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वदूर पसरली होती. त्यांच्या सनईच्या सुरांनी असंख्य विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक समारंभ भारावून गेले होते. त्यांच्या वादनातील माधुर्य, शिस्त आणि पारंपरिकतेची जपणूक यामुळे त्यांना रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळाले होते.

पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या ताफ्याला मोठी मागणी होती. लग्नकार्य, यात्रा असो वा मोठे धार्मिक उत्सव—हरीभाऊंच्या सनईशिवाय कार्यक्रम अपूर्ण असल्याची भावना आयोजकांमध्ये होती. त्यांच्या सुरेल सनईमुळे अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अधिक संस्मरणीय बनले.

साधी राहणी आणि उच्च कलात्मकता ही त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या सुरेल सनईच्या तालावार अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण संगीतप्रेमी समाजाचा मोठा आधार हरपला आहे. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून “सनईचा एक सुरेल आवाज कायमचा थांबला” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago