महाराष्ट्र

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

संभाजीनगर: वैजापूर तालुका शिऊर गाव, छ. संभाजीनगर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार नावाचा भोंदू बाबा अनेक महिन्यांपासून लोकांची फसवणूक करत होता.

लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे, अशा थापा मारून बाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. मंदिरात ढोलकी, मंत्रजाप आणि “अलख निरंजन” च्या आरोळ्या देत तो अघोरी कृत्य करत असे, त्याने काही लोकांच्या मानेवर पाय ठेवणे, पोटावर काठी ठेवणे, तोंडात लघवी करणे, नाकाला बूट लावणे असे क्रूर प्रकार केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल

17 जुलै 2025 रोजी तक्रारदार किशोर शांताराम आघाडे यांच्या फिर्यादीवरून, वैजापूर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. सध्या तपास सुरू असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

भोंदू बाबांवर कठोर कारवाई का गरजेची आहे

अनेकदा अशिक्षित किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे लोक अशा फसवणुकीला बळी पडतात. त्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान होत. त्यामुळे संपूर्ण राज्यात अशा फसव्या भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई ही काळाची गरज आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

17 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago