महाराष्ट्र

वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई: भारतात उत्पादित होणाऱ्या पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. २०२५ च्या अखेरीस पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले. तसेच, मेड इन इंडिया 6 जी नेटवर्क विकसित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी मोदी म्हणाले, “या वर्षाच्या अखेरीस पहिली स्वदेशी विकसित सेमीकंडक्टर चिप बाजारात येईल.” इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने दशकांपूर्वी देशांतर्गत सेमीकंडक्टर तयार करण्याची संधी गमावली होती, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सर्वांना माहित आहे की सेमीकंडक्टर उत्पादन ५०-६० वर्षांपूर्वी भारतात सुरू होऊ शकले असते, परंतु भारताने ती संधी गमावली आणि तीच परिस्थिती बराच काळ चालू राहिली. मात्र आज आपण ही परिस्थिती बदलली आहे. भारतात सेमीकंडक्टर कारखाने सुरू होऊ लागले आहेत. याशिवाय भारत लवकरच इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रात एक मोठी शक्ती बनणार आहे. भारत आता जगातील १०० देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणार आहे. या यशाशी संबंधित एक खूप मोठा कार्यक्रम मंगळवारी (२६ ऑगस्ट) दोन दिवसांनी आयोजित केला जात आहे.” अशीही माहिती मोदींनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रयत्नांवरही यावेळी प्रकाश टाकला. “आम्ही मेड इन इंडिया 6जी नेटवर्क विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहोत. जगात होत असलेल्या प्रगतीशी जुळवून घेण्यावर सरकारचे लक्ष आहे.” असंही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

4 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

4 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

4 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

4 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

15 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

19 तास ago