महाराष्ट्र

उल्हासनगर-कल्याणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

वीज वितरण विभागाकडून सातत्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वर्षभरात देखभालीच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय का येतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

देखभालीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता किंवा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे या कामांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देखभालीवर कोट्यवधींचा खर्च करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसेल, तर या कामांचा दर्जा आणि खर्चाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक,…

2 मिनिटे ago

VJTI वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ॲड. अमोल मातेले आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद…

5 मिनिटे ago

न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त; राज्यपालांच्या हस्ते शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची…

10 मिनिटे ago

रोहयोच्या कामांना गती द्या; पात्र नागरिकांना कामाची कमतरता भासू देऊ नका; भरत गोगावले

मुंबई: ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी…

14 मिनिटे ago

संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही; एकनाथ शिंदेंचा ठाम निर्धार

अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज…

17 मिनिटे ago

भावनिक रक्षाबंधन; अजितदादांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राखी अर्पण

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा भावनिक कार्यक्रम…

24 मिनिटे ago