उल्हासनगर-कल्याणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

महाराष्ट्र

उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

वीज वितरण विभागाकडून सातत्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वर्षभरात देखभालीच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय का येतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

देखभालीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता किंवा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे या कामांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देखभालीवर कोट्यवधींचा खर्च करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसेल, तर या कामांचा दर्जा आणि खर्चाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत