महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारण तापले; आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा, नव्या पक्षफुटीच्या चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेगआला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल, असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, असा दावा करत शिंदे गटाचे “ऑपरेशन टायगर” हे प्रत्यक्षात “ऑपरेशन फडणवीस” असल्याचे म्हटले. या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटातही विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदारही सत्ताधारी आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही खासदार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असली, तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही या चर्चांचे खंडन केले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी शिंदे गटाकडून मलाही पक्षप्रवेशाची ऑफर आली होती, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष संपवण्याऐवजी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची स्पर्धा लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी, “स्वतःच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर वेगळी भाषा वापरणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे, अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा एकदा खंडणीची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. “सेटलमेंट करा, अन्यथा थेट गोळी मारू,” असा धमकीचा फोन आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही फेब्रुवारी २०२६ मध्ये साजिद खान पठाण यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चंद्रपूरमध्ये उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त संचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी नागपूरला जावे लागू नये, यासाठी…

1 तास ago

आधुनिक शिक्षण क्रांतीशिवाय ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार होणार नाही

मुंबई: भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वाधिक परिवर्तनाची अपेक्षा ज्या क्षेत्राकडून आहे,…

1 तास ago

केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे; राज्याने केंद्राशी समन्वय साधावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या…

1 तास ago

लोकशाही वाचवा निर्धार सभा; नागरिकत्व आणि लोकशाही धोक्यात असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित "लोकशाही वाचवा निर्धार सभा"…

1 तास ago

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक; महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ हे केवळ कायदा नसून मातीत जीव ओतणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला,…

1 तास ago

राज्यात ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला वेग; रोस्टर पूर्ण होताच महाविद्यालयांना एनओसी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने…

1 तास ago