महाराष्ट्र

विदेशी दारु महागल्याने ‘देशी’ला आले अच्छे दिन

कोल्हापूर: राज्याच्या तीजोरीत महसुलाचा ओघ वाढवण्यासाठी सरकारने विदेशी दारूवर लादलेली जबर करवाढ आता उलटी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करवाढीमुळे विदेशी दारूच्या किमती प्रचंड वाढल्याने अनेक तळीरामांनी आपला मोर्चा स्वस्त आणि आकर्षक बनलेल्या ‘देशी’कडे वळवला आहे.

परिणामी, राज्यभरातील बार आणि परमिट रूममधील विदेशी दारूची विक्री निम्म्याहून अधिक घटली असून, शासनाचा महसूल वाढवण्याचा हेतूच विफल होण्याची भीती व्यक्तहोत आहे.

शासनाला देशी-विदेशी दारूच्या विक्रीतून यापूर्वी वार्षिक 43 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र, सध्या असलेली राज्याची आर्थिक चिंता विचारात घेऊन राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी देशी, भारतीय बनावटीची विदेशी आणि विदेशी दारूवर 10 टक्के व्हॅट, 15 टक्के परवाना शुल्क आणि 9 ते 70 टक्के जादा उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या करवाढीमुळे शासकीय तिजोरीत आणखी किमान 14 हजार कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, शासनाच्या या निर्णयाचे विपरीत परिणाम आता राज्यभर दिसू लागले आहेत.

महसुलाचे लक्ष्य गाठणे शासनासाठी मोठे आव्हान

शासनाचा तिजोरी भरण्याचा निर्णय सध्या तरी व्यावसायिकांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. विदेशी दारूच्या विक्रीतील मोठी घट पाहता, महसुलाचे लक्ष्य गाठणे शासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. याउलट, या निर्णयामुळे नकळतपणे देशी दारूच्या उद्योगाला चालना मिळाली असून, बनावट दारूच्या बेकायदेशीर व्यापारालाही खतपाणी मिळत असल्याचे चित्र आहे.

विदेशीला फटका; बनावट दारूला ऊत

नवीन करवाढीनंतर भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमती बारमध्ये प्रति बाटली 50 ते 200 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या संख्येवर आणि विक्रीवर झाला आहे.

ग्राहक घटले: बारमधील ग्राहकांची संख्या 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाली.

विक्री रोडावली: दारूची विक्री तब्बल 70 ते 80 टक्क्यांनी घटल्याचा दावा बार चालकांकडून केला जात आहे.

बनावट दारूचा सुळसुळाट: विशेषतः सीमाभागात बनावट दारूची तस्करी वाढली आहे. कर्नाटक बनावटीची ‘हुबळीमेड’ दारू 50-60 रुपयांना आणून 150-200 रुपयांना विकली जात आहे, ज्यामुळे शासनाचा दुहेरी महसूल बुडत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

2 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

2 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

2 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

2 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

2 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

2 तास ago