महाराष्ट्र

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व सर्वांगीण विकासासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.

दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयी-सुविधा तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर करण्यात आले.

संस्थानने मांडलेल्या मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांशी समन्वय साधत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील **’दर्शन बारी’**चा गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला विषयही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

बैठकीला परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…

56 मिनिटे ago

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…

1 तास ago

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ…

1 तास ago

शिरूर! घोडनदी किनारी गावठी हातभट्टीवर छापा; मुद्देमाल जप्त, दोघे फरार…

शिरूर : शिरूर पोलिसांनी निमोणे गावाच्या हद्दीतील भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर…

2 तास ago

विड्याचे पान खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.…

6 तास ago

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

21 तास ago