पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व सर्वांगीण विकासासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.
दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयी-सुविधा तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर करण्यात आले.
संस्थानने मांडलेल्या मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांशी समन्वय साधत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील **’दर्शन बारी’**चा गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला विषयही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
बैठकीला परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…