महाराष्ट्र

आषाढी वारीतील 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान

मुंबई: मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण 2 कोटी 80 लाख रुपये निधी वितरित करण्याचा शासन आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. हा आदेश कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला आहे.

महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांतील 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे.

या निधीच्या वितरणासाठी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, तहसीलदार (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, पालखी सोहळा, दिंड्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पालखी मार्गावरील टोल नाक्यांवर शुल्क आकारले जात असल्याने वारकरी संस्थांवर आर्थिक भार पडत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या कालावधीत अशा सर्व वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर टोलमाफी देण्याची मागणी विविध वारकरी संघटनांसह शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजकल्याण विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' हा मराठी…

1 तास ago

अहिल्यानगरात भरदिवसा गँगवॉर; तरुणावर कोयता-रॉडने जीवघेणा हल्ला, गोळीबाराचीही चर्चा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून…

1 तास ago

महाराष्ट्रातील राजकारण तापले; आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा, नव्या पक्षफुटीच्या चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेगआला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून…

1 तास ago

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदत

मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत राज्य…

16 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत…

16 तास ago

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी…

18 तास ago