महाराष्ट्र

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा पक्ष सत्तेत असतानाही हा निर्णय का घेतला जात नाही?

सावंत यांनी पुढे टीका करताना गोपीचंद पडळकर, सदा खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी आक्रमक भूमिका घेणारे हे नेते आता गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.

तेलंगणा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीत विलीनीकरणाला मान्यता देत कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये १०–११ टक्के वेतनवाढ, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, रिक्त पदांची भरती, तसेच विविध प्रलंबित आर्थिक व प्रशासकीय मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, कामाच्या तासांमध्ये सुधारणा, अपघात विमा बळकट करणे, निवृत्ती लाभ जलद देणे, बस ताफा वाढवणे आणि डेपो सुविधांमध्ये सुधारणा यांसारखे निर्णयही घेण्यात आले आहेत. एकूण ३२ पैकी सुमारे ३१ मागण्या सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी विलीनीकरणाची मागणी जोरात होती. मात्र, सत्तांतरानंतरही महायुती सरकारकडून या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

2 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

5 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago