मुंबई: मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती दिली.
१२ वर्षीय चिमुकली मुळची बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. २६ जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकत अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्यानं या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. तसेच या रॅकेटच्या संबंधित १० जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेसंदर्भात हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले, ‘१२ वर्षीय चिमुकलीचे रिमांड होममध्ये काउन्सलिंग करण्यात आले आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिनं सगळा प्रकार सांगितला. तिला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते. नंतर तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिचं लैंगिक शोषण केलं’.
ही चिमुकली शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली होती. आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिनं घर सोडलं. बांगलादेशहून भारतात आली. काही लोकांना मुलगी एकटी दिसली. मदतीची भुलथाप देत तिला वेश्याव्यवसायात ढकललं.’ दरम्यान, मथाई यांनी पोलिसांकडे २०० पुरूषांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…