महाराष्ट्र

कष्ट अन् जिद्दीच्या जाेरावर समीक्षा शेलारची ग्रंथपाल पदाला गवसणी

कोरेगाव: नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला.

आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने पाच ऑक्टोबर २०२४ ला एकूण १७ पदनामांसाठी ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात काढली होती. त्यातील ग्रंथपाल पदासाठी समीक्षा शेलार हिने लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात समीक्षा शेलार हिने एसईबीसी प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक मिळवला. तिची ग्रंथपालपदी निवड झाली.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील समीक्षाचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माध्यमातून तिने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ग्रंथपाल हा डिप्लोमा पूर्ण केला आहे. समीक्षाने या यशाचे श्रेय आई मीना, वडील संदीप, कुटुंबीय, शिक्षकांना दिले. या यशाबद्दल व निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

2 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

2 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

13 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

13 तास ago