महाराष्ट्र

जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही; अजित पवार

पुणे: अजित पवार जातीयवादी आहेत, असे काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्यासाठी म्हणतात. मात्र, जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही, याची मी खात्री देतो,’ अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला पवार यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले. पवार म्हणाले की, मला कुणावर टीकाटिप्पणी करायची नाही. मला जसे कळायला लागले आहे, तेव्हापासून कधीही जातीयवाद केला नाही. सर्वांना एकत्र करूनच मी वाढलो आहे. माझ्याकडे येणार्‍यांची मी कधीच जात पाहत नाही, असे देखील पवार म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करणार्‍यांचा सत्कार समारोह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत तरंगे यांनी आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, धनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, अभिमन्यू होळकर आदी उपस्थित होते.

प्रशासकीय क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, शैक्षणिक क्षेत्रातून अ‍ॅड. चिमनराव डांगे, कृषी क्षेत्रातून धुळा कोकरे, उद्योग क्षेत्रातून राहुल हजारे, आरोग्य क्षेत्रातून अविनाश गोफणे, क्रीडा क्षेत्रातून रेश्मा पुणेकर, पुरुष कृषी क्षेत्रातून वेताळ शेळके, महिला कुस्ती क्षेत्रातून वैष्णवी थोरवे, क्रीडा क्षेत्रातून अरुण पाडुळे यांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

अजित पवार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही दिशादर्शक असून, त्यांच्या आदर्शाने राज्याचा कारभार पुढे नेट आहोत. त्यांनी त्या काळात केलेल्या कामांची मोठी सध्या दुरावस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीची कामे आम्ही हाती घेतली आहेत. धनगर समाजाचे आराध्य दैवत असणारे सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील बिरोबा मंदिरात आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली जाईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी या वेळी दिली.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, अजित दादांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायम टीका केली जाते. धनगर समाजाचे आराध्य दैवत आरेवाडीचे बिरोबा मंदीर असून, त्याच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वी, जलसंधारण, मंदिरांचा जीर्णोद्वार यांसह अनेक सामाजिक कामे केली. त्यांच्या या कामाचा आम्ही आदर्श घेऊन कामे करत आहोत. तरंगे म्हणाले की, अहिल्यादेवींचे कार्य हे देशभर नव्हे तर जगभर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

7 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

12 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

12 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

12 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

12 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

14 तास ago