महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील २७ हजार ३१७ महिलांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रति महिना 1500 रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी अक्षरशः अर्ज खूप आले होते. जाचक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभ मिळाला मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आले आहे.

आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणे बंद करण्यात येत आहे.पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालयी असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे.नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज करता येत नाही,अशात यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार 317 लाडक्या बहिणींचा पत्ता कट करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या घरी घरी चारचाकी वाहन आहे. जे लाभार्थी आयकर दाते आहेत,नमो शेतकरी सन्मानचे लाभार्थी,संजय गांधी निराधार, एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 317 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 मिनिटे ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

5 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

5 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

5 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

5 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

15 तास ago