खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये तरुणाला जबर मारहाण करत त्याच्या २८ वर्षीय बायकोचे अपहरण करण्यात आले. पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील ही धक्कादायक घटना आहे. ‘सैराट’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे हा मारहाण आणि अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या आई आणि भावानेच हे धक्कादायक कृत्य केले आहे.
विश्वनाथ गोसावी आणि त्याची बायको प्राजक्ता गोसावी असे मारहाण करण्यात आलेल्या नवरा-बायकोची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विश्वनाथ गोसावीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे प्राजक्ताचे कुटुंबीय प्रचंड चिडले होते. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे अपहरण केले.
भरचौकात ही मारहाण आणि अपहरणाची घटना घडली. घटनास्थळी उपस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यामध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह १५ जणांविरोधात अपहरण आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…