महाराष्ट्र

उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा; संघाचाही दबाव

नवी दिल्ली: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अशातच भाजपला या पदासाठी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यांची भाजप पार्श्वभूमी आहे. शिवाय, ते संघाच्याही जवळचे मानले जातात.

भाजप नेतृत्वाने त्यांच्या पसंतीनुसार जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतिपदावर आणले होते. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतिपद हे रिक्त झाले आहे. अशा परिस्थितीत, भाजपने संघाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला या पदावर आणावे. भाजपवर अशा व्यक्तीचे नाव पुढे करण्याचा दबाव आहे, जो संघाची पसंती देखील असेल. त्यात जे. पी. नड्डा यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार शोधणे अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर भाजपवर उमेदवाराबाबत दबाव वाढत आहे. भाजप नेतृत्वाला त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीची या पदावर निवड व्हावी, अशी अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, भाजपला या पदासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी द्यायची आहे. ते भाजप पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांना आरएसएसचा अनुभवही आहे.

नड्डा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत केलं काम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार असू शकत नाही. अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे त्यांच्या नामांकनात कोणताही अडथळा नाही. परंतु, आरएसएस त्यांच्या नावावर सहमत नाही. याचे कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान नड्डा यांनी केलेले विधान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधकांशी चांगले संबंध

विरोधी पक्षांशीही चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत, ते विरोधकांसोबतच्या सर्व प्रकारच्या गतिरोधांना संपवण्यात प्रभावी ठरतील. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून ओम माथूर, थावरचंद गेहलोत तसेच शरद पवार यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. जर शरद पवार यांना काही प्रमाणात पटवून दिले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे भाजप नेतृत्वाचे मत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

16 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

16 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

17 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago