महाराष्ट्र

ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का; लोकशाही उत्सवात नागरिकांचा सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

ठाणे: राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मुंबईतही सकाळीच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयी-सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

8 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

8 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

9 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago