महाराष्ट्र

महागाई ही मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम; अतुल लोंढे

NEET विद्यार्थ्यांच्या मृत्यूंसाठी केंद्र जबाबदार 

मुंबई: देशातील वाढती महागाई ही केवळ इराण युद्धामुळे नसून मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांचा परिपाक असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते Atul Londhe यांनी केला आहे. तसेच NEET पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या “सरकारने घेतलेले बळी” असल्याचे म्हणत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि NTA अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधन महागल्याने खाद्यतेल, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार असून त्याचा थेट परिणाम जनतेवर होत आहे. पंतप्रधान Narendra Modi यांनी महागाईचे कारण युद्धाला दिले असले तरी प्रत्यक्षात ही परिस्थिती सरकारच्या अपयशी धोरणांमुळे निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

लोंढे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना सांगितले की, २०१४ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ५८ होता, तो आता ९५ रुपयांवर पोहोचला असून लवकरच १०० रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. “जगातील सर्वाधिक घसरण झालेले चलन म्हणजे रुपया,” असा दावा करत त्यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेवरही सवाल उपस्थित केला.

युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर १४७ डॉलर प्रति बॅरल असतानाही पेट्रोल ७२ रुपये आणि डिझेल ५८ रुपये होते, तर आज कच्चे तेल ११० डॉलरवर असूनही पेट्रोल १०० रुपयांपुढे गेले आहे, असे ते म्हणाले. तसेच “३५ रुपयांत पेट्रोल देण्याचे आश्वासन काय झाले?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘मॅन्युफॅक्चरिंग’सारख्या योजनांवर टीका करत त्यांनी या योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रशिया आणि इराणकडून रुपयांमध्ये स्वस्त तेल मिळत होते, मात्र अमेरिकेच्या दबावामुळे भारताला ते बंद करावे लागल्याचा आरोपही त्यांनी केला. या स्वस्त तेलाचा फायदा सर्वसामान्यांना न होता Reliance Industries आणि नायरा कंपन्यांना झाल्याचे त्यांनी म्हटले.

NEET पेपरफुटी प्रकरणावर बोलताना लोंढे यांनी सांगितले की, २३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी या मृत्यूंसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan आणि NTA महासंचालकांवर कारवाई न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या…

10 तास ago

मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी…

11 तास ago

MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत

मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा…

12 तास ago

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; दिल्ली दौऱ्यासाठी एअर इंडियाने प्रवास

मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली…

13 तास ago

शिरुर; निमोणे येथील माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांचे निधन

न्हावरे (प्रतिनिधी) निमोणे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग विठोबा दुर्गे यांचे नुकतेच निधन झाले.…

13 तास ago

कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या…

13 तास ago