महाराष्ट्र

नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी; शेतकऱ्यांवर जबरदस्ती नको; विजय वडेट्टीवार

मुंबई: नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणात अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव, तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात वडेट्टीवार यांनी सांगितले की, रिंगरोडसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी आहेत. ४ मेच्या यादीत नसलेल्या काही सर्व्हे क्रमांकांचा नंतर समावेश करण्यात आला असून, काही विशिष्ट व्यक्ती व कंपन्यांच्या फायद्यासाठी रिंगरोडचे अलायन्मेंट बदलल्याचा आरोप त्यांनी केला. जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांना घराबाहेर काढणे आणि महिलांशी धक्काबुक्की झाल्याच्याही तक्रारी त्यांनी सभागृहात मांडल्या.

यावर उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी रिंगरोडचे अलायन्मेंट बदलण्यात आले का, तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची माहिती आधीच मिळवून कोणी जमीन खरेदी केली का, याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून १५ दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, शेतकऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.

कुंभमेळ्यासाठी रिंगरोड महत्त्वाचा असला तरी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य मोबदला देऊनच भूसंपादन प्रक्रिया राबवावी, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. यावर महसूल मंत्र्यांनीही कोणाच्याही जमिनी बळजबरीने घेतल्या जाणार नाहीत आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल, अशी ग्वाही दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

5 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

6 तास ago

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…

6 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

6 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

10 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

10 तास ago