महाराष्ट्र

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील ‘एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५ पैकी तब्बल १९१ तालुके अजूनही औद्योगिक समूहाविना असल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत उपस्थित केला.

नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेद्वारे तांबे यांनी एमआयडीसी नसलेल्या व औद्योगिक विकासापासून वंचित तालुक्यांमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना जवळपास दोन दशकांनंतरही प्रभावीपणे राबवली जात नसल्याची टीका केली.

केंद्र सरकारने २००९-१० मध्ये सुरू केलेली आणि राज्याने २०१३-१४ पासून स्वीकारलेली ‘एक तालुका – एक क्लस्टर’ योजना स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी होती. मात्र, सरकारने १२४ प्रकल्प कार्यान्वित झाल्याचा दावा केला असला तरी त्या प्रकल्पांची तालुकानिहाय यादी जाहीर करण्याची मागणी तांबे यांनी केली.

संगमनेरसारख्या एमआयडीसी नसलेल्या तालुक्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा भागात क्लस्टर उभारले असते तर स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळाली असती. उर्वरित तालुक्यांमध्ये योजना नेमकी कधी राबविणार आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात १८६ क्लस्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यांची एकूण किंमत १,९१६.१५ कोटी रुपये असल्याची माहिती दिली. यापैकी १२४ प्रकल्प कार्यान्वित झाले असून राज्य व केंद्र सरकारकडून मिळून ९२६.६७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या प्रकल्पांमधून सुमारे ३० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

प्रत्येक तालुक्यात क्लस्टर उभारता आले नसल्याची वस्तुस्थिती मान्य करत मंत्री सामंत यांनी अनुदान प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, लाभार्थ्यांचा स्वहिस्सा आणि यंत्रसामग्री आयातीतील विलंबामुळे काही प्रकल्प रखडल्याचे सांगितले. या अडचणी दूर करून ‘एक तालुका – एक क्लस्टर’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

5 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

6 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

6 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

10 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

10 तास ago

RTOतील कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत गदारोळ; वडेट्टीवारांच्या मागणीनंतर संबंधित अधिकारी सक्तीच्या रजेवर

मुंबई: परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते…

10 तास ago