छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर खरा अधिकार मच्छीमार बांधवांचाच
मुंबई: कोळी समाज हा या मुंबईचा मुळ भूमिपुत्र असलेला समाज असताना देखील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतून मच्छीमारांचे स्थलांतर करुन हा भूखंड विकासकाच्या घशात घातला गेला, असा आरोप करत मच्छीमार बांधवांना मुंबईतून उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शासन दरबारी शिजत आहे का..? असा संतप्त सवाल आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत उपस्थित केला.
शेख म्हणाले, मुळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या मासळी मंडईंच्या परवानग्या रद्द केल्या जात आहेत. सुमारे ५० वर्षांपासून पासून मासळी व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईत दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी संपूर्ण कोकण किनारपट्टीपासून वसई, वर्सोवा, रायगड, रत्नागिरी ते मालवणपर्यंतचे मासळी उत्पादक विक्रीसाठी येतात.
हा भूखंड कोळी समाजाने ४०० कोटी रुपयात ३० वर्षांच्या भाडे करारावर घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र तरीही या भूखंडाचे आरक्षण रद्द करून ‘आवा डेव्हलपर’ या कंपनीला ३० वर्षांसाठी ३६९ कोटी रुपयांना आणि पुढील ३० वर्षांसाठी केवळ १ ते १००१ रुपयांमध्ये भाडेपट्ट्यावर दिल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.जर मच्छीमार संस्था विकासकापेक्षा ५० कोटी जास्त देऊन आपली मंडई वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हा भूखंड बिल्डरच्या घशात का घातला जातोय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सागरी हद्दीत परराज्यातील ट्रॉलर्स करत असलेल्या अनधिकृत मासेमारीचाही मुद्दा उपस्थित केला. गस्ती नौका नसल्याने मासेमारी बंदी काळातही परराज्यातील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत हैदोस घालत आहेत. हे असेच चालू राहिल्यास शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमार बांधवांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल, असंही शेख शेवटी म्हणाले.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…