छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर खरा अधिकार मच्छीमार बांधवांचाच
मुंबई: कोळी समाज हा या मुंबईचा मुळ भूमिपुत्र असलेला समाज असताना देखील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतून मच्छीमारांचे स्थलांतर करुन हा भूखंड विकासकाच्या घशात घातला गेला, असा आरोप करत मच्छीमार बांधवांना मुंबईतून उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शासन दरबारी शिजत आहे का..? असा संतप्त सवाल आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत उपस्थित केला.
शेख म्हणाले, मुळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या मासळी मंडईंच्या परवानग्या रद्द केल्या जात आहेत. सुमारे ५० वर्षांपासून पासून मासळी व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईत दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी संपूर्ण कोकण किनारपट्टीपासून वसई, वर्सोवा, रायगड, रत्नागिरी ते मालवणपर्यंतचे मासळी उत्पादक विक्रीसाठी येतात.
हा भूखंड कोळी समाजाने ४०० कोटी रुपयात ३० वर्षांच्या भाडे करारावर घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र तरीही या भूखंडाचे आरक्षण रद्द करून ‘आवा डेव्हलपर’ या कंपनीला ३० वर्षांसाठी ३६९ कोटी रुपयांना आणि पुढील ३० वर्षांसाठी केवळ १ ते १००१ रुपयांमध्ये भाडेपट्ट्यावर दिल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.जर मच्छीमार संस्था विकासकापेक्षा ५० कोटी जास्त देऊन आपली मंडई वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हा भूखंड बिल्डरच्या घशात का घातला जातोय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सागरी हद्दीत परराज्यातील ट्रॉलर्स करत असलेल्या अनधिकृत मासेमारीचाही मुद्दा उपस्थित केला. गस्ती नौका नसल्याने मासेमारी बंदी काळातही परराज्यातील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत हैदोस घालत आहेत. हे असेच चालू राहिल्यास शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमार बांधवांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल, असंही शेख शेवटी म्हणाले.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…