महाराष्ट्र

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

मुंबई: राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या एक्स हँडलवरून जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

14 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

17 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

17 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

17 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

19 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

19 तास ago