महाराष्ट्र

आयटम साँग, प्रौढ संगीत मुलांना लवकर मॅच्यूअर बनवून भावनांनाही हानी पोहचवतात

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात आयटम साँग आणि प्रौढ स्वरुपाचं संगीत प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं. शाळकरी मुलं, अगदी ७-८ वर्षांची लहान मुलंसुद्धा अशा गाण्यांवर थिरकत असल्याचं आपण रोजच पाहतो. परंतु या गाण्यांचा मुलांच्या निष्पाप मनावर होणारा परिणाम अनेकदा पालकांच्या लक्षातच येत नाही.

मुलं वयाच्या आधी मोठी होतात

तज्ज्ञांच्या मते अशा गाण्यांमध्ये वापरले जाणारे द्वयर्थी शब्द, अत्याधिक नृत्याचे अंग प्रदर्शन आणि प्रौढ विषय मुलांच्या मनात लवकर प्रौढ होण्याची प्रवृत्ती निर्माण करतात. यामुळे —

मुलं लवकर “मॅच्युअर” होतात

खेळ, अभ्यास आणि बालपणाचा आनंद हरवतो.

अनावश्यक कुतूहल आणि चुकीच्या कल्पना डोक्यात येतात.

वर्तणुकीत बंडखोरी, चिडचिड, तणाव वाढतो.

मुलांवर मानसिक आणि भावनिक परिणाम

निष्पापपणा कमी होतो: बालसुलभ विचारांवर प्रौढ विषयांचे आच्छादन होते.

संवेदनशीलता कमी होते: नातेसंबंध, प्रेम, नैतिकता याबाबत चुकीच्या समजुती निर्माण होतात.

गोंधळ वाढतो: काय योग्य, काय अयोग्य हे ओळखण्याची क्षमता कमी होते.

भावनिक असुरक्षितता: लहान वयात अवास्तव भावना समजून घेता न आल्याने गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण होते.

काय करायला हवे…

पालकांनी मुलांशी खुलेपणाने संवाद साधावा

मोबाईल, टीव्ही, इंटरनेटवर पालकांचे नियंत्रण ठेवावे

योग्य वयाला अनुरुप गाणी, गोष्टी आणि शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून द्यावी

अशा सामग्रीकडे कॅज्युअली न पाहता गंभीरतेने विचार करावा

समाजामध्ये जागरूकता निर्माण करून बालमनाचे रक्षण करणे आवश्यक आहे

काय होते या गीतांमुळे

नैतिकतेची सीमारेषा मुलांना कळेनाशी होते

नातेसंबंध, लैंगिकता, आकर्षण याबाबत चुकीच्या कल्पना पक्क्या होतात

वास्तव आणि काल्पनिक यातील फरक करणे कठीण होते

मानसिक विकासाच्या नैसर्गिक प्रक्रियेला धक्का बसतो

शेवटी एवढंच…बालपण हे आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचं टप्पं आहे. या काळात मुले जर चुकीच्या गाण्यांच्या प्रभावाखाली आली, तर त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकत. म्हणूनच पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन मुलांना सकारात्मक संस्कार योग्य मनोरंजन आणि समतोल विचारांची दिशा देणं अत्यावश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

10 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

10 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

14 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

14 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

14 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

14 तास ago