न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे दारु पाजण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांच्या आत शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता वडगाव रासाई गावातील सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगाव रासाई) याचा खून झाला. दारु पाजण्यावरुन झालेल्या वादात आरोपी राहुल दत्ता गव्हांडे (वय २३, मूळ रा. उमरखेड, जि. यवतमाळ, सध्या रा. वडगाव रासाई) याने जावीर याला हाताने मारुन डोके दगडावर आपटुन त्याला ठार मारले.
या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच हणमंत नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथके तयार करुन रवाना केली. या पथकाला तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान आरोपीच्या हालचालीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव रासाई येथील पाटीलमळा परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक झाल्यानंतर चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हणमंत नकाते, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, नाथसाहेब जगताप, अशोक शिंदे, संपत खबाले, अमोल गवळी, पोलीस अंमलदार नितेश थोरात, अजय पाटील, अमोल माने, किशोर वाघ, तानाजी बाबर, विजय शिंदे, सचिन भोई, निरज पिसाळ, पवन तायडे, रविंद्र आव्हाड, निखील रावडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.
दारु पाजण्याच्या वादातून वडगाव रासाईत मित्राचा खून
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…