नाशिक: संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधून एक वेगळीच आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला.
वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेत जोरदार प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली त्या बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला.
वाद वाढल्यानंतर माध्यमांशी बोलताना माधवी जाधव म्हणाल्या,”गिरीश महाजनांनी फार मोठी चूक केली आहे. ज्यामुळे संविधान अस्तित्वात आहे, त्या बाबासाहेबांना संपवण्याचं काम सुरू आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की,”मी बाबासाहेबांचं नाव भाषणात येईल याची वाट पाहत होते. पण लोकशाही आणि संविधानाशी संबंध नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेतली गेली. मग संविधानाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचं नाव का नाही?”
या घटनेनंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या भूमिकेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेवर राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…