पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता मान्यवर कवींच्या कवि संमेलनाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे.
मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” या कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर आपल्या कविता सादर करणार आहेत. याबरोबरच कुठे तरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले… घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले अशा धीर गंभीर कवितेतून नाजूक कोमल भावना व्यक्त करणारे कवि प्रशांत मोरे, तर दुसऱ्या भाषेने पैसा, संपत्ती सारं सारं काही दिलं… पण अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीने जगण्याचे “चीज” केले अशी मराठीची स्तुती करणारे कवि डॉ. विजय देशमुख आणि कवयित्री डॉ. स्मिता दातार, मृणाल केळकर, महानंदा मोहिते आपल्या कविता सादर करणार आहेत.
काव्यवाचन स्पर्धा
पनवेल महानगरपालिका अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काव्य प्रतिभेला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता ‘कविता वाचन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनालाचा लाभ इच्छुकांनी जरूर घ्यावा. असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…