‘संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण’ यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न
नाशिक: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत महिलांचे संघटन, त्यांची व्होट बँक तयार करणे आणि सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली.
याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी संघटित होऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पोलीस, वकील आणि डॉक्टर यांसारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जनता दरबार आयोजित करणे गरजेचे आहे.” तसेच, महिलांनी कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडवून एकत्र राहण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे*, असे सांगत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिवसेना कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी सूचित केले.
४ थे महिला धोरणावर सविस्तर चर्चा
या बैठकीत महिलांसाठीच्या चौथ्या महिला धोरणाचा कसा फायदा करून घेता येईल, यावरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या धोरणाअंतर्गत महिलांसाठी नवीन योजना, अर्थसहाय्य, रोजगार संधी, सुरक्षाविषयक सुधारणा आणि नेतृत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. महिलांनी या धोरणाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी जागरूक राहावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख ॲड. श्रद्धा कुलकर्णी, श्रीमती मंगला भास्कर, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमती पूजा वाघ, इगतपुरी ग्रामीण जिल्हा प्रमुख श्रीमती पूजा धुमाळ, नाशिक महानगर प्रमुख श्रीमती अस्मिता देशमाने, नाशिक जिल्हा समन्वयक शामला दीक्षित आणि दिंडोरी लोकसभा जिल्हा प्रमुख श्रीमती रोशनी कुंभार्डे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रभागसंख्या आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने आगामी निवडणुकीसाठीही चर्चा करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सभासद मोहीम राबवण्याची आवश्यकता असून, शिवसेना महिला आघाडीने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…