‘संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण’ यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न
नाशिक: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत महिलांचे संघटन, त्यांची व्होट बँक तयार करणे आणि सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली.
याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी संघटित होऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पोलीस, वकील आणि डॉक्टर यांसारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जनता दरबार आयोजित करणे गरजेचे आहे.” तसेच, महिलांनी कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडवून एकत्र राहण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे*, असे सांगत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिवसेना कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी सूचित केले.
४ थे महिला धोरणावर सविस्तर चर्चा
या बैठकीत महिलांसाठीच्या चौथ्या महिला धोरणाचा कसा फायदा करून घेता येईल, यावरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या धोरणाअंतर्गत महिलांसाठी नवीन योजना, अर्थसहाय्य, रोजगार संधी, सुरक्षाविषयक सुधारणा आणि नेतृत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. महिलांनी या धोरणाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी जागरूक राहावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख ॲड. श्रद्धा कुलकर्णी, श्रीमती मंगला भास्कर, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमती पूजा वाघ, इगतपुरी ग्रामीण जिल्हा प्रमुख श्रीमती पूजा धुमाळ, नाशिक महानगर प्रमुख श्रीमती अस्मिता देशमाने, नाशिक जिल्हा समन्वयक शामला दीक्षित आणि दिंडोरी लोकसभा जिल्हा प्रमुख श्रीमती रोशनी कुंभार्डे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रभागसंख्या आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने आगामी निवडणुकीसाठीही चर्चा करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सभासद मोहीम राबवण्याची आवश्यकता असून, शिवसेना महिला आघाडीने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…