मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या २४ मार्चपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.
उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., एम.पी.एड. व बी.एड.-एम.एड. या सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा ‘सीईटी’ कक्षाने निश्चित केल्या आहेत. या सात अभ्यासक्रमांपैकी सहा प्रवेश परीक्षांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर एलएलबी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमासाठी नोंदणीची मुदत रविवार (ता. १५) पर्यंत देण्यात आली आहे.
२०२६ मधील पहिली सीईटी २४ मार्च रोजी होणार असून त्या दिवशी एम.पी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १७ मेपर्यंत एकूण १७ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यांत या प्रवेश परीक्षा पार पडतील.आत्तापर्यंत १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दोन्ही संधी मिळून १७ लाख ४२ हजार ६० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
या प्रवेश परीक्षांची प्रवेशपत्रे संबंधित परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती, प्रवेशपत्र व सूचनांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
सीईटी परीक्षांचे वेळापत्रक असे :
एम.पी.एड. – २४ मार्च
एम.पी.एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन) – २५ मार्च
एम.एड. – २५ मार्च
बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी) – २७ ते २९ मार्च
एलएलबी (तीन वर्षे) – १ ते २ एप्रिल
बी.पी.एड. – ४ एप्रिल
बी.पी.एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन) – ५ ते ७ एप्रिल
बी.एड.-एम.एड. (तीन वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) – ९ एप्रिल
एलएलबी (पाच वर्षे) – ८ मे
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…
मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…