महाराष्ट्र

निवडून आलात म्हणजे हवेतील भाषा चालणार नाही; सहर शेख यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा थेट इशारा

मुंब्रा पालिकेतील एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सहर शेख यांनी “अहंकारी लोकांना जनतेने कसे हरवले ते पाहिले ना?” अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत थेट इशारा दिला आहे.

“निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. अशा खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, “ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव–शाहू–फुले–आंबेडकरांची विचारधारा जपली आहे. मात्र काही दिवसांपासून MIM च्या स्थानिक उमेदवारांकडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली जात आहे. निवडणूक लढवण्यासाठी MIM ला फंडिंग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी-टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको.”

“निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा लोकांची कामं करा. आम्ही मात्र कायम आव्हाड साहेब यांच्यासोबत आहोत,” असे ठाम मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.

या प्रकरणामुळे मुंब्रा-कल्याण परिसरातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

16 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

16 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

16 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

16 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

18 तास ago