महाराष्ट्र

हायकोर्टाचा दणका! हायकोर्टाचा दणका अन् मंत्र्याचा मुलगा अखेर सरेंडर

महाड: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे मंत्री व शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात सरेंडर केले आहे. नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होता.

नेमकं प्रकरण काय?

मागील महिन्यात २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. महाड शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदान सुरू असतानाच मोठा गोंधळ उडाला. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याच वेळी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

गंभीर गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरार

या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्याविरोधात कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांसमोर हजर होणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिले.यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

हायकोर्टाची कडक टिप्पणी

या प्रकरणात गुरुवारी हायकोर्टाने प्रशासनाला जोरदार झापले.“एका मंत्र्याच्या मुलाला अटक करता येत नसेल, तर सरकार किती हातबल आहे?”अशी कडक टिप्पणी करत न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अखेर पोलिसांसमोर हजर

हायकोर्टाच्या या फटकार्यानंतर शुक्रवारी सकाळी विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विकास गोगावलेंचा दावा

या प्रकरणात आपली बाजू मांडताना विकास गोगावले यांनी असा दावा केला आहे की,“सुशील झांबरे यांनीच माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती.”मात्र, महायुतीतील दोन मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकल्याने महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

आता विकास गोगावले यांच्यावर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई कशी होते, तसेच अटक की जामीन याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

9 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

9 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

9 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

9 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

9 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

9 तास ago