पुणे (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणी म्हणजेच सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वतःच्या शेताची पीक पाहणी करुन नोंदणी करता येणार आहे.
पीक नोंदणीसाठी अॅपमधून शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकाचा फोटो घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक सहायक नेमण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पाहणी पुर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहायक उर्वरित क्षेत्राची पाहणी करतील.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु असुन, गेल्या वर्षापासून हे अॅप संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामासाठी अॅपचे व्हर्जन ४.०.० गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून, सहायकांवर अवलंबून न राहता स्वतःच पाहणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच अडचणी आल्यास गावातील पीक पाहणी सहायकाकडून मदत घेता येणार आहे.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…