पुणे (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणी म्हणजेच सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वतःच्या शेताची पीक पाहणी करुन नोंदणी करता येणार आहे.
पीक नोंदणीसाठी अॅपमधून शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकाचा फोटो घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक सहायक नेमण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पाहणी पुर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहायक उर्वरित क्षेत्राची पाहणी करतील.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु असुन, गेल्या वर्षापासून हे अॅप संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामासाठी अॅपचे व्हर्जन ४.०.० गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून, सहायकांवर अवलंबून न राहता स्वतःच पाहणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच अडचणी आल्यास गावातील पीक पाहणी सहायकाकडून मदत घेता येणार आहे.
संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली; शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता पाटील यांच्याकडे ठाण्याचे…
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…