पुणे (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणी म्हणजेच सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वतःच्या शेताची पीक पाहणी करुन नोंदणी करता येणार आहे.
पीक नोंदणीसाठी अॅपमधून शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकाचा फोटो घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक सहायक नेमण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पाहणी पुर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहायक उर्वरित क्षेत्राची पाहणी करतील.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु असुन, गेल्या वर्षापासून हे अॅप संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामासाठी अॅपचे व्हर्जन ४.०.० गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून, सहायकांवर अवलंबून न राहता स्वतःच पाहणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच अडचणी आल्यास गावातील पीक पाहणी सहायकाकडून मदत घेता येणार आहे.
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…