शिरूर (अरुणकुमार मोटे): शहराच्या रामलिंग रोड परिसरातील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या सुप्रसिद्ध बेकरीतून विकत घेतलेल्या पावाच्या लादीत घुशीची घाणेरडी लेंडी आढळल्याने शिरूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न सुरक्षेबाबतचा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेकऱ्यांमधील अस्वच्छतेचे गंभीर वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.
ही धक्कादायक घटना (दि. २०) जुलै रोजी सतीष तागड यांच्याबाबतीत घडली. त्यांनी बेकरीतून दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता, त्यामध्ये एका लादीत चक्क घुशीची लेंडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संबंधित बेकरीत धाव घेतली आणि हा प्रकार इतर ग्राहकांसमोर उघड केला. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की,”शिरूर व परिसरातील इतर बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून, अन्न प्रशासन विभाग केवळ कागदोपत्री सक्रिय आहे.”
हॉटेल्स आणि बेकऱ्यांमध्ये शिळे, बिनधास्त व साठवलेले पदार्थ खुलेआम ग्राहकांना दिले जात आहेत.या घटनेची गंभीर दखल घेत अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी तात्काळ मन्सूर बेकरी, शनी मंदिर शिरूर येथे बेकरीची पाहणी करून ती सील केली आहे. तसेच बेकरीचे फूड लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे.या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, “फक्त एका बेकरीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण शिरूर तालुक्यातील बेकऱ्यांची व हॉटेल्सची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी आता होऊ लागली आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये केवळ बेकऱ्यांमध्येच नव्हे तर दुध भेसळ, हॉटेल्समधील साठवलेले खराब अन्न, आणि अस्वच्छ स्वयंपाकघरांचेही प्रमाण वाढले आहे. या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून, यामागे अन्न सुरक्षा यंत्रणेची ठोस कारवाई नसल्याचा आरोप केला जात आहे. जर प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
अन्न प्रशासन यंत्रणेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचे वारंवार सिद्ध होत असल्याने, आता संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना शिरूरसारख्या वाढत्या शहरात अन्न सुरक्षेच्या ढासळलेल्या व्यवस्थेचे गंभीर चित्र स्पष्ट करते. आता अन्न प्रशासन प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…