महाराष्ट्र

स्थानिक मागण्या मान्य! पालघर जिल्हाधिकारी कार्यालय घेराव स्थगित

राज्यस्तरीय मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार

पालघर: ठाणे–पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि कोळी बांधवांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या जोरदार लॉंग मार्चनंतर महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख मागण्या मान्य झाल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्तावित घेराव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माकपने स्पष्ट केले आहे.

दोन दिवस पायी चालत हजारो शेतकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते. लॉंग मार्चच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर स्थानिक मागण्यांवर जिल्हाधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

तसेच, वरकस व बेनामी जमिनी नावे करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माकप व किसान सभेच्या पाच कार्यकर्त्यांचा समावेश असलेली समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात राज्य सरकार तातडीने कायदा करणार असून, त्याचा मसुदा यावेळी किसान सभेला देण्यात आला.

अकोले ते लोणी लॉंग मार्चदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार वरकस जमिनींबाबत अद्याप कारवाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पालघर लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर यावर ठोस कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. धरणातील पाण्यावर स्थानिकांचा हक्क, सिंचन व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घराच्या तळ जमिनी नावे करण्याची कार्यवाही तसेच रोजगार हमी कामांची उपलब्धता या मागण्यांनाही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, वाढवण बंदर व मुरबे बंदर रद्द करण्याची तसेच स्मार्ट मीटर बसविणे तातडीने थांबविण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत असून, या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यासाठीचे आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे माकपने स्पष्ट केले आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, माकप जिल्हा सचिव किरण गहला, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या प्राची हातिवलेकर, रडका कलंगडा, लक्ष्मण डोंबरे, लहानी दौडा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

15 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

15 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

20 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

20 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

20 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

20 तास ago