मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे शुक्रवारी (ता. ९) रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामन्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे पार पडला.
कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड,पारनेर, हवेली, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोते वर्ग उपस्थित होता. या भागातील कलगीतुऱ्याचा सर्वात मोठा महोत्सव असतो. सदर कार्यक्रमाला लोक उस्फूर्तपणे देणगी देतात. कोरोना काळातील दोन वर्षाचा खंड वगळता या कार्यक्रमला खंड पडला नाही. पौराणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी विषयावरती कलगीतुरा म्हणणारे गायक व त्याची साथीदार बहारदार कार्यक्रम करतात. लोणी मधील पंचरास मंडळीनी या कार्यक्रमाची सुरुवात नांदीने केली.
सदर कार्यक्रमासाठी सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, माजी प्राचार्य वसंत वाळुंज , उद्योजक संतोष वाळुंज, सरपंच सागर जाधव, सहारा उद्योग समूह समूहाचे नामदेवराव वाळुंज, समाज भूषण कैलासराव गायकवाड, शिवाजी गेनभाऊ शिनलकर, बबनराव चौधरी, सदस्य रुक्मिणी वाळुंज आदी मान्यवर उपस्थित उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलगीतुरा अभ्यासक लोणी गावचे माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी केले.
सवाल जवाबा चे योग्य परीक्षण करून प्रश्न उत्तर बरोबर आहे की नाही हे श्रोत्यांना समजावून सांगतात. कलगी तुरा कार्यक्रमास माझे खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, भगवानराव वाघ, सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलिस पाटील संदीप आढाव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संतोष पडवळ, हैबतआढाव, माजी चेअरमन सतीश थोरात, बाळासाहेब आदक, बबन दादा वाळुंज, जगनराव लंके, बाळासाहेब गायकवाड इत्यादी मंडळींनी सहकार्य केले. लोणी ग्रामस्थांनी व कलगीतुरा मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारगाव कारखाना पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक रमेश इचके, सचिन डामसे, रामभाऊ वाळुंज बंदोबस्त साठी हजर होते.
लोणीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन…
नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…
नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…
नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…
नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…
मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या…
मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…
नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…