महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “महायुतीत एकत्र आहोत तर स्थानिक पातळीवरही एकत्र येणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही, तर भविष्यात लोकसभा, विधान परिषद आणि इतर निवडणुकांबाबत वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. निवडणुका पार पडल्या असल्या तरी काही जिल्ह्यांत वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. रायगडमध्ये तर हा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.“त्यांना आमची गरज नसेल, तर त्याचाही विचार केला जाईल. महायुतीत आहोत तर एकत्र राहणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत गोगावले यांनी मांडले.

पालकमंत्रिपदावरही सूचक प्रतिक्रिया

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता गोगावले यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय,” असे म्हणत त्यांनी थेट भाष्य टाळले. महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू असताना गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

रायगडमधील या घडामोडींमुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

16 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

22 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

22 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

22 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

22 तास ago