रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “महायुतीत एकत्र आहोत तर स्थानिक पातळीवरही एकत्र येणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही, तर भविष्यात लोकसभा, विधान परिषद आणि इतर निवडणुकांबाबत वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. निवडणुका पार पडल्या असल्या तरी काही जिल्ह्यांत वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. रायगडमध्ये तर हा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.“त्यांना आमची गरज नसेल, तर त्याचाही विचार केला जाईल. महायुतीत आहोत तर एकत्र राहणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत गोगावले यांनी मांडले.
पालकमंत्रिपदावरही सूचक प्रतिक्रिया
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता गोगावले यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय,” असे म्हणत त्यांनी थेट भाष्य टाळले. महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू असताना गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
रायगडमधील या घडामोडींमुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…