महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “महायुतीत एकत्र आहोत तर स्थानिक पातळीवरही एकत्र येणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही, तर भविष्यात लोकसभा, विधान परिषद आणि इतर निवडणुकांबाबत वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. निवडणुका पार पडल्या असल्या तरी काही जिल्ह्यांत वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. रायगडमध्ये तर हा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.“त्यांना आमची गरज नसेल, तर त्याचाही विचार केला जाईल. महायुतीत आहोत तर एकत्र राहणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत गोगावले यांनी मांडले.

पालकमंत्रिपदावरही सूचक प्रतिक्रिया

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता गोगावले यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय,” असे म्हणत त्यांनी थेट भाष्य टाळले. महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू असताना गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

रायगडमधील या घडामोडींमुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

7 तास ago