महाराष्ट्र

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने महाराष्ट्र द्वितीय स्थानी

विविध श्रेणीत 6 पुरस्कार पटकावले

मुंबई: पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत.

सन 2022 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून कामकाज बघत असतांना केलेल्या विविध एकात्मिक विकासाभिमुख नियोजनामुळे ग्रामविकास विभागास राष्ट्रीय पातळीवर एकुण 6 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मी पुरस्कार प्राप्त सर्व ग्रामपचांयत, पंचायत समिती तथा संस्था यांचे मनापासून अभिनंदन करतो. या ही पुढे अशीच उत्कृष्ट कामगिरी होईल अशी अपेक्षा करतो.

पंचायती राज मंत्रालयाकडून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत संस्थांना राष्ट्रीय स्तरावर विविध श्रेणींमध्ये पुरस्कृत केले जाते. या वेळी दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार या अंतर्गत, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी ओळखल्या गेलेल्या नऊ श्रेणींमधील पहिल्या तीन ग्रामपंचायतींना एकूण 27 पुरस्कार दिले जाणार आहेत. एकूण नऊ नानाजी देशमुख उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार पहिल्या तीन गाव, गट आणि जिल्हा पंचायतींना देण्यात येत आहेत. तसेच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आणि कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट पंचायत क्षमता विकास संस्थेचा पुरस्कार ग्रामपंचायतींसाठी विशेष श्रेणीतील तीन संस्थांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे पंचायत संस्थांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात एकूण 45 पुरस्कार प्रदान केले जातील.

श्री.गिरीष महाजन

एकूण कामगिरी

त्रिपुरा – ७,

ओडिशा – ७,

महाराष्ट्र – ६,

आंध्र प्रदेश – ४,

बिहार – ३,

हिमाचल प्रदेश – ३,

कर्नाटक – २,

केरळ – २,

लडाख – २,

आसाम – २,

तामिळनाडू – २,

उत्तर प्रदेश-2,

गुजरात- 1,

छत्तीसगड- 1,

तेलंगणा-1

1) दिनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ व हरित पंचायत म्हणून मौजे मोडाळे ता. इगतपुरी जि. नाशिक ही ग्रामपंचायत देशात तृतीय.

2) नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मौजे मन्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

3) नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट पंचायत समिती म्हणून तिरोरा पंचायत समिती जि. गोंदिया पंचायत समिती देशात तृतीय.

4) ग्राम ऊर्जा स्वराज विशेष सवंर्ग पुरस्कारांतर्गत मौजे मन्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

5) कार्बन न्युट्रल विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मौजे बेळा ता.जि. भंडारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

6) पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अंतर्गत पुणे येथील यशदा अकॅडमी देशात तृतीय

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago