मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली Ankita Walawalkar सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंकिताचे सोशल मीडियावर सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स असून ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
अंकिता म्हणाली की, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे मला वाटते.यावेळी मराठी भाषेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे. इतर भाषांचा आदर करतानाच आपली मातृभाषा टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बोली भाषांबद्दल विचारले असता अंकिता म्हणाली की, महाराष्ट्रात अनेक बोली भाषा आहेत. बिग बॉसमध्येही वेगवेगळ्या बोली ऐकायला मिळाल्या, काही तर माझ्यासाठीही नवीन होत्या. मालवणीसह अनेक बोली या मराठीच्या उपभाषा आहेत. त्यामुळे विविधता जपत आपण सर्वांनी मिळून मराठी भाषा जपली पाहिजे, असेही ती म्हणाली.
दरम्यान, मराठी चित्रपट किंवा नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर कोणाला प्राधान्य देशील? असा प्रश्न विचारल्यावर अंकिता म्हणाली की, मला नाटकात काम करायला आवडेल. कारण नाटकातून खूप काही शिकायला मिळते. आणि जर अभिनय जमला नाही, तर भविष्यात निर्मिती क्षेत्रात नक्की काम करेन, असेही तिने सांगितले.
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…