मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली Ankita Walawalkar सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंकिताचे सोशल मीडियावर सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स असून ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
अंकिता म्हणाली की, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे मला वाटते.यावेळी मराठी भाषेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे. इतर भाषांचा आदर करतानाच आपली मातृभाषा टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बोली भाषांबद्दल विचारले असता अंकिता म्हणाली की, महाराष्ट्रात अनेक बोली भाषा आहेत. बिग बॉसमध्येही वेगवेगळ्या बोली ऐकायला मिळाल्या, काही तर माझ्यासाठीही नवीन होत्या. मालवणीसह अनेक बोली या मराठीच्या उपभाषा आहेत. त्यामुळे विविधता जपत आपण सर्वांनी मिळून मराठी भाषा जपली पाहिजे, असेही ती म्हणाली.
दरम्यान, मराठी चित्रपट किंवा नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर कोणाला प्राधान्य देशील? असा प्रश्न विचारल्यावर अंकिता म्हणाली की, मला नाटकात काम करायला आवडेल. कारण नाटकातून खूप काही शिकायला मिळते. आणि जर अभिनय जमला नाही, तर भविष्यात निर्मिती क्षेत्रात नक्की काम करेन, असेही तिने सांगितले.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…
टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…