महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्रांवरून नवा वाद; विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात तक्रार

छत्रपती संभाजीनगर: कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे महसूल मंत्री Radhakrishna Vikhe Patil आणि मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या विरोधात Chhatrapati Sambhajinagar Police परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी ही तक्रार दाखल केली असून, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी राज्यात १२ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती माध्यमांना दिली होती. मात्र हा आकडा फुगवलेला असून प्रत्यक्षात वाटप अत्यंत कमी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

त्याचबरोबर मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांनी ४ कोटी २२ लाख मराठा समाज कुणबी आरक्षणात गेला असल्याचे अनधिकृत व खोटे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संशय व जातीय तणाव वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, त्यामुळे मंत्री Radhakrishna Vikhe Patil आणि Manoj Jarange Patil यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मराठा नेते व मराठा आरक्षण याचिकाकर्ते Vinod Patil यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, हैदराबाद गॅझेटनुसार किती कुणबी प्रमाणपत्रे दिली गेली याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. आकडे फुगवून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज असल्याचे आम्ही मांडत असताना मोठ्या प्रमाणावर आरक्षण दिल्याचे सांगितले जात असल्याने न्यायालय वेगळा प्रश्न उपस्थित करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.यासोबतच मराठवाड्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच महामंडळांमध्ये नव्हे तर थेट सरकारी खात्यांमध्ये नोकरी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

3 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

3 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

3 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

18 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

21 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago