ठाणे: कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, “घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करून समाजाला प्रेरणा देत आहे.” यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ४० वर्षीय तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांच्या समाजसेवेचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत.” आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी समाजबांधवांना शुभेच्छाही दिल्या.
ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सांगितले. अहमदाबाद-घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे वळविण्यात येणार असल्याने ठाणे शहर वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणावर मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यापारी समाजाच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी ठाण्यात उद्योग-व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच साकेत परिसरातील त्रिमंदिर, प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटल आणि महावीर हॉस्पिटलसारख्या उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…
पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…
परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…