महाराष्ट्र

ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत खुल्या (Open) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उत्पन्न आणि अभ्यासक्रमानुसार 50 ते 100 टक्क्यांपर्यंत फी सवलतीचा लाभ मिळू शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील पहिल्या दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. तसेच हा लाभ केवळ पूर्णवेळ (Full-time) अभ्यासक्रमांसाठी लागू असून विद्यार्थी इतर कोणत्याही शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा.

फी सवलतीचे स्वरूप

वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत: शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमध्ये 100% फी माफी, तर विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये 50% फी सवलत.

₹2.5 लाख ते ₹8 लाख उत्पन्न (व्यावसायिक अभ्यासक्रम): 50% पर्यंत फी सवलत.

₹8 लाखांपर्यंत उत्पन्न (बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रम): 100% फी माफी.

आवश्यक कागदपत्रे

अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास CAP राउंडची कागदपत्रे, गॅप सर्टिफिकेट आणि दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र सादर करावे लागते.

अर्ज प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत MahaDBT पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

7 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

7 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

8 तास ago

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…

8 तास ago

गांधी नकोत, पण गांधींचा चष्मा हवा!

परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…

11 तास ago

गोकुळच्या निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; मुश्रीफ-महाडिक गटाचा संघर्ष टोकाला

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…

2 दिवस ago